So…you…think…you…can…clear…Prelims?


मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची विकेट उडाली असेल राज्यसेवेची प्रिलिम्स देतांना, होय ना?
सर्वच जण म्हणताहेत कि पेपर फारच कठीण होता, बरोबर ना?
चूक, अगदी चूक. का?… जाणून घ्यायचं? तर पुढे वाचा.
ज्यांनी आमची राज्यसेवेची प्रिलिम्स साठी झालेली “टेस्ट सिरीज” दिली त्यांना माहित आहेच कि कसल्या प्रकारचे प्रश्न अपेक्षित होते. मला अगोदरच माहित होत कि आता मुख्य परोक्षेसाठी “ओब्जेक्टीव्ह” पटर्ण झाला आहे तर पेपर्स नक्कीच किचकट करून टाकेल एम. पी.एस.सी. म्हणून त्याच धर्तीवर आम्ही ”टेस्ट सिरीज” प्लान केली होती. तेव्हासुद्धा बऱ्याच जणांची विकेट उडाली होती.
मित्रांनो, पेपर फारच कठीण नव्हता! तुमची तयारीच त्या लेवल ची नव्हती!
आता पर्यंत जे सिरिअस नव्हते त्यांनी मात्र जमेल त्या २ ते ४ पुस्तकातून अभ्यास केला आणि परीक्षा दिली परंतु तसे न करता ज्यांनी १५ ते २० पुस्तकातून अभ्यास केला त्यांचा स्कोर नक्कीच १०० च्या पुढे असेल.
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठीच काय तर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आता तुम्हाला विस्तृत (extensive) पणे अभ्यास करावा लागेल. कारण जो पर्यंत खोलवर वाचन करीत नाही तो पर्यंत मुख्य मुद्दे आणि concept कळणारच नाही. खोलवर वाचन करूनच चालणार नाही तर त्यावर मनन सुद्धा करावे लागेल. आणि मनन करूनच चालणार नाही तर त्यावर प्रश्न कसे येतील ह्यावर वेळ घालवावा लागेल. जो अभ्यास केला त्यावर काय प्रश्न येवू शकतील हे प्रत्यक्षात करून पाहावे लागेल आणि सकारात्मकच नव्हे तर नकारात्मक प्रश्न सुद्धा तयार करावे लागतील. प्रत्येक मुद्द्याचा सखोल अभ्यास करूनच हे जमेल. जो करणार नाही तो क्लियर होणार नाही हे नक्कीच!!! त्यामुळे ज्यांची तयारी हे सर्व करायची आहे त्यांनीच पुढे जावे अन्यथा वेळ वाया घालवून स्वत:चं जींवन अंधारात फेकू नका.
मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण आमचा पी.जी.पी. (पर्सनल गायडंस प्रोग्राम) काय आहे त्यात काय आहे हे बघत आले पण” फी जास्त आहे” असे म्हणून जॉईन व्हायचं टाळत आले. तर मित्रांनो, मला हे सर्व (कसल्या प्रकारचे प्रश्न अपेक्षित होते) आधीच माहित असल्यामुळे मी त्यासाठीच पी.जी.पी. त्याच पद्धतीने तयार केला होता. संपूर्ण भारतात एकही अकादमी नाही जी इतक सगळ साहित्य तुम्हास तुमच्या घरी देत असेल, नाही, कोणतीच नाही पण फक्त आमची “‘AD’s IAS Academy” देते. कारण ज्या पद्धतीने जसा अभ्यास करायचा त्याच पद्धतीने त्यासाठी अभ्यासाचं साहित्य सुद्धा लागते.
तर मित्रांनो, आता जे झालं ते झालं….आता तशी चूक करू नका. जमेल तितका अभ्यासच साहित्य जुळवा आणि वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला लागा. उगीच “cut -off काय असेल” ह्याची चिंता करू नका. रिझल्टची वाट जो पाहिलं त्याला २०१२ ची नाही तर २०१३ चीच परीक्षा द्यावी लागेल कारण रिझल्ट नंतर अभ्यासाला वेळ कुठे मिळेल?

By - AnilMD