Exam Time Table and Important Instructions

MPSC Rajyaseva Prelims – 18th May 2013

Paper I – 10:30 AM to 1 PM (actual exam starts 11AM)

Paper II – 2:30 PM to 5 PM (actual exam starts 3PM)

Hall Ticket – परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशप्रमाणपत्र समावेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे .

उमेदवाराने सकाळी 10.30 व दुपारी 2.30 वाजता परीक्षा कक्षात हजर रहाणे आवश्यक आहे. सकाळी 10.30 ते 11.00 व दुपारी 2.30 ते 3.00 हा कालावधी हजेरी तपासणे, उत्तरपत्रिका देणे व सूचना देणे यासाठी राहील. परीक्षेचा कालावधी दोन तासाचा असेल व त्याप्रमाणे प्रत्यक्ष परीक्षा सकाळी 11.00 वाजता व दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. सकाळी 11.00 व दुपारी 3.00 वाजल्यानंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षा कक्षात आणण्यास परवानगी असलेले साहित्य :- प्रवेशप्रमाणपत्र, काळया शाईचे बॉल पॉइंट पेन.

इतर कोणतेही साहित्य परीक्षा कक्षात स्वत:जवळ ठेवण्यास सक्त मनाई आहे.

प्रवेशप्रमाणपत्रावर तसेच परीक्षेच्यावेळी पुरविण्यात येणा-या उत्तरपत्रिकेवर व प्रश्नपुस्तिकेवर दिलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचून त्यांचे अनुपालन करावे. केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आदींकडून तसेच आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.

परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणासाठी परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षा कक्षात आणण्यास परवानगी असलेले साहित्य :- प्रवेशप्रमाणपत्र, काळया शाईचे बॉल पॉइंट पेन.

परीक्षेच्यावेळी परिगणकासारख्या (CALCULATOR) कोणत्याही साधनांचा उपयोग करण्यास सक्त मनाई आहे. तसेच कोणतीही पुस्तके, वहया, बॅग्ज, अनाधिकृत वस्तू इ. साहित्य परीक्षा कक्षात स्वत:जवळ ठेवण्यास सक्त मनाई आहे.

डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन इत्यादी सारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना ते परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर शिस्तभंगविषयक कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.

परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरील नोंदी काळजीपूर्वक भराव्यात. हजेरीपटावर विहित जागेत उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपुस्तिकेचा छापील अनुक्रमांक लिहून शेवटच्या रकान्यात संपूर्ण स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. हजेरीपटावर केलेली स्वाक्षरी परीक्षेच्या अर्जावर व उत्तरपत्रिकेवर केलेल्या स्वाक्षरीशी जुळणारी असावी.

प्रश्नपुस्तिकेच्या मुख पृष्ठावर इंग्रजी आद्याक्षर (A,B,C,D) हे संच क्रमांक दर्शविते. प्रश्नपुस्तिकेवरील सदर संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे नमूद करणे व संबंधित वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. संच क्रमांकासंदर्भातील उत्तरपत्रिकेवरील कोडींग अचूकपणे न केल्यास शून्य गुण देण्यात येतील. कोडींग करण्यात त्रुटी राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील व या संदर्भातील कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

सदर परीक्षेची प्रश्नपुस्तिका बहुपर्यायी उत्तरे असलेल्या वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. प्रश्नपुस्तिका मिळाल्यावर प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रश्नपुस्तिकेतील पृष्ठे क्रमाने बरोबर आहेत काय, तसेच प्रश्नपुस्तिकेतील सर्व प्रश्न अनुक्रमाने आहेत किंवा नाहीत किंवा इतर मुद्रणदोष आहे काय, याची खात्री करुन घ्यावी व त्यात काही दोष असल्यास प्रश्नपुस्तिका तात्काळ बदलून घ्यावी.

उत्तरपुस्तिकेवर प्रश्नपुस्तिका क्रमांक व संच क्रमांक इ. माहिती लिहून झाल्यावर प्रश्नपुस्तिका बदलून दिली जाणार नाही. तसेच या संदर्भात परीक्षेनंतर आलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपुस्तिका सोबत घेऊन जाण्याची परवानगी आयोगाने दिली आहे.

इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत जेंव्हा प्रश्न छापलेले असतात, तेंव्हा इंग्रजीतील किंवा मराठीतील प्रश्नांमध्ये मुद्रणदोषामुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास पर्यायी भाषेतील प्रश्नाशी तो प्रश्न ताडून पहावा.

उत्तरपत्रिकेवरील माहिती भरण्याकरीता फक्त काळया शाईचे बॉल पॉईंट पेन वापरण्यास परवानगी आहे. ब्लेड, खेाडरबर किंवा पांढरा द्रव (Whitener) वापरुन उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करण्यास सक्त मनाई आहे.

उत्तरपत्रिकेवर एकूण 200 प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची सोय आहे. या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेमधील सर्व प्रश्न अनिवार्य असतील. प्रत्येक प्रश्नक्रमांकासमोर O O O O अशी चार वर्तुळे असून, प्रत्येक वर्तुळात पर्यायी उत्तरांचे आकडे दिलेले आहेत. प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेतील संबंधित वर्तुळात छायांकित करावीत.

उत्तरपत्रिकेमध्ये खालील नमुन्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे योग्य उत्तराचे निवडलेले वर्तुळ फक्त काळया शाईच्या बॉलपेनने संपूर्णपणे छायांकित करुन प्रत्येक प्रश्नांचे उत्तर नमूद करावे. अयोग्य पध्दतीने नमुद केलेल्या उत्तरास गुण दिले जाणार नाहीत.

उत्तरपत्रिकेमध्ये विहित केलेल्या ठिकाणीच आपली उत्तरे नमूद करावीत. प्रश्नपुस्तिकेवर वा अन्य ठिकाणी उत्तरे लिहिल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे, असे समजून कारवाई करण्यात येईल.

एकदा नमूद केलेली माहिती वा उत्तरे खोडता येणार नाहीत. अथवा त्यामध्ये बदल करता येणार नाहीत. उत्तरपत्रिकेत नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने नमूद केल्यास अथवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास त्याचे ते उत्तर ग्राहय मानले जाणार नाही व अशा उत्तरांना शून्य गुण देण्यात येतील.

आयोगाने नकारात्मक गुणांकनाची (Negative Marking) पध्दत लागू केली असल्यामुळे प्रश्नांची अचूक उत्तरेच नमूद करावीत. प्रश्नपत्रिका क्र. 1 मध्ये 100 प्रश्न, 200 गुण विहित करण्यात आले आहे. सदर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल एक तृतीयांश गुण वजा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच प्रश्नपत्रिका क्र. 2 मध्ये 80 प्रश्न, 200 गुण विहित करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका क्र. 2 मधील अभ्यासक्रमातील “Decision Making and Problem Solving” हा घटक वगळून उर्वरीत प्रश्नांच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल एक तृतीयांश गुण वजा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रश्नपुस्तिकेत काही त्रुटी आढळल्यास याबाबतचे लेखी निवेदन उपसचिव (गोपनीय), महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक ऑफ इंडियाची इमारत, 3 रा मजला, महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा चौक, मुंबई- 400001 यांच्याकडे संपूर्ण तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून आठ दिवसांच्या आत सादर करावे.

आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत लेखनिकाची मदत घेता येणार नाही.

उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपुस्तिका परीक्षा कालावधीत परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाता येणार नाही. तसेच, परीक्षेच्या कालावधीत संपूर्ण उत्तरपत्रिका आणि परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग-1 परीक्षा कक्षाबाहेर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा कालावधी पूर्ण होण्यास पाच मिनिटे असताना इशारा घंटा दिली जाईल. त्यानंतर पेपर संपल्याची अंतिम घंटा झाल्यावर उत्तरे लिहिणे लगेच थांबविले पाहिजे. आपल्या उत्तरपत्रिका परीक्षा कालावधी संपल्यानंतर लगेचच समवेक्षकांच्या ताब्यात द्याव्यात. तसेच सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका समवेक्षकांनी गोळा केल्यावर मोजून त्यांचा हिशोब लागेपर्यंत आपापल्या जागेवर बसावे.

आयोगाच्या वेबसाईटवरील स्पर्धा परीक्षा अंतर्गत “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” तसेच “परीक्षा” या विभागातील “राज्यसेवा परीक्षा” मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व तरतुदी काळजीपूर्वक वाचाव्यात.

परीक्षेस प्रवेश दिला, म्हणून आयोगाने उमेदवारी स्वीकारली, असा अर्थ होत नाही. उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

ऑनलाईन अर्जप्रणालीव्दारे सादर केलेली माहिती या प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेली आहे. त्यामध्ये चूक / विसंगती आढळल्यास त्यासंबंधीचे लेखी निवेदन उमेदवाराने आयोगाच्या http://www.mpsconline.gov.in या वेबसाईटवरुन अभिप्राय/सूचना (Feed-Back) व्दारे अथवा admin@mpsconline.gov.in या ई-मेलवर स्वत:च्या तपशीलासह परीक्षेच्या दिनांकापासून 8 दिवसांच्या आत सादर करावे. अशी चूक/विसंगती बाबतचे निवेदन आयोगास सादर केलेल्या ऑनलाईन अर्जातील दाव्याप्रमाणे असावे.

प्रवेशप्रमाणपत्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारावरच राहील. अन्य व्यक्तीकडून कोणत्याही कारणाकरिता सदर प्रवेशप्रमाणपत्राचा दुरुपयोग केला गेला, तर त्या व्यक्तीकडून मदत घेतली नसल्याचे सिध्द करण्याची जबाबदारी उमेदवारावर राहील.

परीक्षेसंदर्भात आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांबाबत आयोगाच्या वेबसाईटचे http://www.mpsc.gov.in अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे राहील.


टीप : या परीक्षेसाठी काही जिल्हा केंद्रावर उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी अधिक संख्येने झाल्याने व या परीक्षेच्या दिवशी सीबीएसई व इतर परीक्षा असल्याकारणाने संबंधीत जिल्हा केंद्रावर सर्व उमेदवारांची बैठकव्यवस्था करणे शक्य झाले नाही. यास्तव सदर जिल्हाकेंद्रावरील काही उमेदवारांची बैठकव्यवस्था नजिकच्या जिल्हा केंद्रांवर करण्यात आलेली आहे, याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

Hall Ticket – Rajyaseva Prelims 2013

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता प्रवेश पत्र २ मे पासून मिळायला सुरुवात होईल.
एमपीएससी ने परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) बद्दल काही सूचना जारी केलेल्या आहेत, त्या खालील प्रमाणे:
  • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ करिता ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईल मधील माहिती अद्ययावत केलेली आहे, अशा उमेदवारांनी परीक्षेस येताना आपल्या सोबत स्वत:चा अलीकडील काळातील फोटो चिकटविलेले प्रवेश पत्र (उपलब्ध चौकोनात स्वाक्षरी करून) सोबत आणावे.
  • प्रवेशपत्रात नमूद केलेल्या आपल्या माहितीत काही तृटि आढळल्यास आवश्यकतेनुसार सुधारणा करावी व परीक्षा संपल्यानंतर सदर प्रवेशपत्र समवेक्षकाकडे जमा करावे.
  • ज्या उमेदवारांनी आपली माहिती अद्याप अपडेट केलेली नाही व ज्या उमेदवारांना आपल्या प्रोफाईल मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध झालेले नाही, अशा उमेदवारांनी स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र व त्याची एक झेरोक्स प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा, तसेच स्वत:च्या अलीकडील काळातील पासपोर्ट साईझ फोटो परीक्षेकरिता येताना सोबत आणावा. परीक्षा केंद्रावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र (फोटोसह संपूर्ण माहिती भरून), त्यासोबत उपलब्ध असलेले हमीपत्र, तसेच ओळखपत्राची एक प्रत समवेक्षकाकडे जमा करावी.
ओरीजनल सूचना ह्या मध्ये उपलब्ध आहे: About Hall-Ticket

List of candidates – not updated Profile

Posted on

खालील 25,911 उमेदवारांनी आपला प्रोफाईल अपडेट केलेला नाही तर त्यांनी त्यांच्या नावासमोर दिलेले आपले सेंटर पडताळावे व ताबडतोब एमपीएससीशी संपर्क साधावा अन्यथा त्यांचे तेच परीक्षा केंद्र समजले जाईल.

List of Candidates in PDF

ज्या उमेदवारांनी अजूनही प्रोफाईल अपडेट केला नाही त्यांनी ssp13@mpsconline.gov.in ह्या इमेल आय. डी. वर संपर्क साधावा अथवा खालील हेल्प लाईन वर संपर्क साधावा:

MPSC Helpline Numbers:
022-22102147
022-22102148
022-22102149
सोमवार ते शनिवार (कार्यालयीन वेळेत)
022-28582700
022-28582701
022-28582702
सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार सोडून कार्यालयीन वेळेत)


2014 – Success Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते


मित्रांनो,

मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत नसते तर ती मिळवावी लागते.

प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक काहीच नाही. एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो, त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच. ज्यांना सफल व्हायचे असते ते दिवस-रात्र मेहनत करतात पण ते फक्त मोजकिच पुस्तके वाचून सफल व्हायचे स्वप्न बघत राहतात मात्र ज्यांना घवघवीत सफलता मिळवायची असते त्यांना पुस्तके वाचण्याची भूक लागते मग ते कुठूनही मिळवायचे आणि वाचून आपली अभ्यासाची भूक मिटवायची असते परंतु त्यांची ती भूक मिटतच नाही.

थोडेफार पुस्तके वाचून अभ्यास होत नाही असे नाही परंतु हवा तितका होत नाही. जितकी डेप्थ हवी तितकी मिळत नाही. जितकी जास्त पुस्तके वाचली तितके जास्त ज्ञान उपलब्ध होते आणि त्याचा वापर परीक्षेसाठी होतो. कोणत्याही मुद्द्यावर सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू कळतात. मग त्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही तो सोडवू शकता मग ती पूर्व परीक्षा असो व मुख्य परीक्षा असो.

थोडेफार पुस्तके वाचून तुम्हाला अस वाटत असेल कि ह्या परीक्षेसाठी जितकी तयारी करायची होती ती मी केली आहे पण कदाचित ते धोकादायक असू शकते. ह्याने तुम्हाला सफलता मिळवता येणार नाही.

मग सफलता मिळवण्यासाठी अजून काय करावे?
सर्वात आधी “मला सफलता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे” असा संकल्प करावा. “त्यासाठी मी काहीही इमानदारीने करीन आणि कितीही अभ्यास करीन” असा दृढ निश्चय करावा. हीच सफलतेची पहिली पायरी आहे. जिथे संकल्प व दृढ निश्चय आहे तेथे पाणी काढता येतेच.

जास्तीत जास्त पुस्तकांचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानात नेहमी भर पाडावी आणि पडतच राहिली पाहिजे अशी काळजी घ्यावी.

जेव्हा जेव्हा असा वाटेल कि माझा अभ्यास व्हावा तितका झाला नाही तर अजून जास्त अभ्यास कसा होईल ते पाहून तो पूर्ण करावाच.

ते करण्यासाठी स्वत:ला शिस्त लावावी म्हणजे तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही आणि मार्गात कितीही अडथळे आलेत तर तुम्ही ते पार कराल.

नेहमी सकारात्मक विचार करावा आणि मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नये. कितीही प्रयत्न केलेत आणि नकारात्मक विचार जात नसतील तर थोडासा ब्रेक घ्यावा आणि एक छान हास्य चित्रपट पहावा किंवा आपल्या आवडीचे एक सुंदर गाणे ऐकत असताना सोबत सोबत ते गाणे मोठ-मोठ्याने म्हणावे. मन एकदम प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल.

जेव्हा तुम्ही अगदी आनंदी असाल तेव्हा परत अभ्यासाला सुरुवात करा. तुमचे प्रयत्न तूम्ही करत रहा. सफलता सहजासहजी व आपोआप (automatic) मिळणार नाही परंतु तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच नक्कीच मिळवू शकाल.

जेव्हा तुम्हाला परीक्षेत असफलता मिळाली तेव्हा निराश होवू नका, त्या असफलतेपासून तुम्ही काही शिकलेत असा अर्थ घ्या. उगीच निराश न बसता पुढील मार्गक्रमण करा.

एकेवेळी तुम्हाला अस वाटेल कि हे सर्व निरर्थक आहे आणि त्यामुळे तुम्ही फार नाराज व्हाल तेव्हा तुमच्या अपेक्षेमागे काहीतरी कारण असेल ते शोधून काढा. जेव्हा ते कारण तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला बर वाटेल आणि त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. मार्ग आहेत पण ते शोधावे लागतात.

तुमच्या जीवनात तुम्हाला काय व्हायचे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे मार्गक्रमण करत रहावे. हे आर्टिकल तुम्ही वाचत आहात ह्याचा अर्थ हाच कि तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल व्हायच आहे, बरोबर न?

तर आता पुढे मी जे काही सांगेल ते तुम्हीं कराच तरच तुम्ही सफलता मिळवू शकाल:
  • सर्वात आधी जी परीक्षा द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम बघा.
  • त्यानुसार जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करा अथवा लायब्ररीतून मिळवा. त्या संपूर्ण पुस्तकांसाठी तुम्ही आमचे ई-प्रोस्पेक्ट्स बघू शकता.
  • आता समजा तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत साठी ७० ते ८० पुस्तकांची गरज पडेल. सोबतच ५ मासिके लागतील, इंटरनेट वरील माहिती लागेल, दररोज २ वर्तमानपत्रे लागतील.
  • ह्या सर्वांचा अभ्यास करायला एक वर्ष लागेल तर सर्वात आधी मुख्य परीक्षेची तयारी करावी मगच पूर्व परीक्षेची तयारी करावी. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास करायला वेळ मिळणार नाही.
  • अभ्यास करत असताना स्वताचे नोट्स काढायला विसरू नका. ह्याला शोर्ट कट नाही किंवा दुसरा पर्याय नाहीच.
  • जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे रिविजन करायला विसरू नका. माझ्या एका पी.जी.पी. student (विणा शिंदे, पुणे) च सुद्धा हेच म्हणणे आहे कि “कधी कधी असे घडते कि फार दिवसानंतर रिविजन केल्यास काही वाचत असतांना अस वाटते कि मी हे वाचलच नाही”. त्यामुळे नियमितपणे रिविजन करणे योग्य ठरते.
  • सराव परीक्षा म्हणजे प्रश्न पत्रिका सोडवून पाहणे हे सफलतेच एक मुख्य कारण आहे. तुम्ही स्वत:ला तपासून बघा, तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे नेहमी पडताळून बघा. जास्तीत जास्त प्रश्न सोडवून बघा आणि तुमचा झालेला अभ्यास Mock Test च्या स्वरुपात तपासून बघा. ह्यासाठी तुम्ही प्रश्न संच सोडवा परंतु तो प्रश्नसंच विकत घेण्याआधी त्याची व त्यातील प्रश्नांची क्वालिटी बघा तरच तो विकत घ्या. तुम्ही http://www.anilmd.com वर मोफत टेस्ट सोडवून बघू शकता त्याने तुम्हाला अंदाज येईल कि परीक्षेत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात.
  • जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर द्यायला तुम्ही चुकले असाल तर मात्र ही गंभीर बाब आहे कारण तुमची झालेली तयारी व्हायची तितकी झालेली नाही हे नक्की.
  • अशा वेळेस परत त्या विषयांची तयारी करावी आणि मग परत Mock Test च्या स्वरुपात स्वत:ची तयारी तपासून बघा.
अशा प्रकारे सफलता तुम्ही स्वत: मिळवू शकाल.

2014 – Success Mantra #1 – What, How Much To Read & Self Made Notes


Hi Friends

(This entire series of Success Mantra’s will be available at the bottom of this page)

Starting today, I am going to write a series of Success Mantra’s for those people who are preparing for 2014 exams. I hope this series will help not only for your preparation for Rajyaseva but also STI, PSI and Asst exams as well as UPSC Civil Services Exam.

परंतु मी हे सर्व मराठीतून लिहावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या लिखाणाचा फायदा सर्वांनाच व्हावा आणि प्रत्येक जणाला ते समजायला सोपे असावे म्हणून. तर मित्रांनो पुढे आहे माझा पाहिला सक्सेस मंत्र आणि तो आहे “काय, किती पुस्तके वाचावेत आणि नोट्स का काढावेत” ह्या विषयावर!

Success Mantra #1

पहिला सक्सेस मंत्र – २०१४ साठी

मित्रांनो, तुम्ही आज फार खुश आहात, होय न? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली म्हणून !!!
हो फार चांगलच आहे !!! पण कोणासाठी? जे राज्यसेवा २०१३ पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी परंतु २०१४ ची तयारी करणाऱ्यांसाठी काय? जस्ट कुल !!! खास तुमच्यासाठी एक सक्सेस मंत्र देतोय २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी, ओके?

सफल होण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे तुमची तयारी आणि ती सुद्धा कशी? एकदम उत्तम! परंतु ती कशी करणार? तेच सांगतोय पण त्याआधी एक अनुभव सांगायचा आहे जो कारणीभूत झाला हे आर्टिकल लिहिण्यासाठी.

मागील २ ते ३ दिवसात मला जो अनुभव आला तो फार टचिंग होता. मी संध्याकाळी तुमच्यापैकी काही मुलांचे लोगिन करून त्यांचा प्रोफाईल अपडेट करत होतो तर कोल्हापूर जवळच्या खेडेगावात राहणारी एक मुलगी जवळच्या शहरात सायबर क्याफे मध्ये बसून प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत होती. ते संपवून तिला घरी जायचे होते पण प्रोफाईल अपडेट होतच नव्हता तर तिचा मेसेज ब्लोगवर वाचला मग मी तिला बोललो कि तुमचे डीटेल्स मला पाठवा आणि जा घरी. मी त्या मुलीचा प्रोफाईल रात्री १ वाजून १३ मिनिटाला अपडेट केला आणि तिला मेसेज केला कि शांत झोप (ती आलरेडी झोपलेलीच असावी :)).

अशा परिस्थितीत खेडोपाडी राहणारे कशी आणि कितपत तयारी करत असतील!!! त्यांच्या जवळ काय मार्गदर्शन उपलब्ध आहे? मी मागील ३ वर्षांपासून हेच काम करत आहे कि त्यांच्या पर्यंत इंटरनेटद्वारे पोचावे आणि योग्य ते मार्ग दर्शन द्यावे.

मी स्वताही गाडी घेवून खेडोपाडी असलेल्या कॉलेजेस मध्ये फिरलोय २०११ मध्ये. ह्या बद्दल कदाचित तुम्ही वाचल असेल ब्लोगवर “Academy On The Move”. पण आता पेट्रोलचे भाव इतके झालेत कि मला स्व:खर्चाने फिरणे अशक्य आहे.

तर मित्रांनो, मी माझा प्रयत्न करत आहे (इंटरनेटद्वारे) सर्वांनाच सांगायचा की पुढील वर्षाच्या राज्यसेवेची तयारी कशी करावी.

तुम्हाला त्यासाठी तयारी कशी करायची?
माझ्या अनुभवानुसार सांगतोय कि जास्तीत जास्त उमेदवार फार कमीत कमी पुस्तकातून तयारी करतात आणि वर्षानुवर्षे परीक्षा दर परीक्षा देतच राहतात…तो मार्ग अगदी चुकीचा आहे. माझे ऐका आणि आता तुम्ही ज्या चुका केल्यात ते सर्व विसरून तुमची पुढील परीक्षा २०१४ मध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमची तयारी कशावर आधारित आहे अगोदर ह्याचा विचार करा?
माझ्या मते तुम्हाला पुढीलप्रमाणे करायला पाहिजे:
  • पूर्व व मुख्य परीक्षेसाठी भरपूर पुस्तके (मी सुचवतो ७० ते ८०. ह्यामध्ये बेसिक ते अडव्हांस पुस्तके)
  • प्रत्येक महिन्यात ४ ते ५ मासिके (एक वर्षात – एकूण ४८ ते ६० प्रती)
  • दररोज कमीत कमी २ वर्तमानपत्रे (एक वर्षात – एकूण ७२० प्रती)
  • इंडिया इयर बुक
  • इंटरनेट: ह्या माध्यमातून तुम्ही बरीच माहिती विनापैश्यांची मिळवू शकता
वरीलपैकी सर्वच तुम्हाला लागेल जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर! तुमचं मुख्य ध्येय्य काय आहे ते विसरू नका त्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल.

मी नेहमी सांगत आलोय की स्वत:चे नोट्स बनवायचे अभ्यास करत असतांना तर आता ते बघूया कि का बर बनवायचेत?

वरील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि तितका अवधी दिलाच पाहिजे. हाच तर खरा सक्सेस मंत्र आहे!

ओके, वरील साहित्याचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स न बनवता अभ्यास केला. लक्षात ठेवा नोट्स न बनवता!!! तर काय होईल?

जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे फार कमी वेळ असेल आणि भरपूर रिविजन करायचं असेल. काल परवा सारख काही झाल तर तेव्हा तुमची तारांबळ उडेल. जरुरी नाही कि असच घडेल पण hope for the best and always be prepared for the worst.

जरी वरील परिस्थिती उद्भवली नाही तर काय होईल?

परीक्षा अगदी जवळ आल्यावर रिविजन करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा काय कराल? माझ्या पुढील प्रश्नांचे उत्तर तुम्ही स्वत:लाच द्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कि मला काय म्हणायचे आहे.
  • प्रत्येक पुस्तक कमीत कमी २०० पानांचं असेल तर किती पुस्तके तुम्ही रिविजनसाठी (त्यावेळी) वाचून रिविजन करू शकाल?
  • तुम्ही जरी त्या पुस्तकात खुणा केलेल्या असतील तर त्या शोधून वाचून काढून समजून घ्यायला किती वेळ लागेल आणि हे सर्व प्रत्येक पुस्तकातून कराव लागेल तेव्हा सर्वच पुस्तकांना न्याय देता येईल का?
  • मासिकांच्या ४८ ते ६० प्रती सुद्धा उघडून खुणा बघून वाचाव्या लागतील तर त्याला किती वेळ जाईल आणि ते सर्व करू शकाल का?
  • दररोज तुम्ही वर्तमानपत्रे वाचत होतात तर नोट्स काढलेले नसतील तर तुम्ही वर्षभराच्या एकूण ७२० प्रती रेफर करू शकाल का इतक्या कमी वेळेत आणि ते सुद्धा वरील पुस्तके व मासिकांच्या सोबतच?
  • इंटर नेटच्या माध्यमातून जो अगोदर वर्ष भर अभ्यास केला होता त्याच काय जर नोट्स काढलेले नसतील तर?
मित्रांनो, ह्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: जेव्हा अभ्यास करता तेव्हा प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मुद्द्यावर स्वत: नोट्स काढा म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत त्यांचे वाचन करता येईल.

रेडीमेड नोट्स वापरू नका कारण त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. ह्याबद्दल यावर Anil MD यांनी फार पूर्वी लिहून ठेवलं आहे ते वाचा: Read HERE

फंडे सीईटीचे!


यंदापासून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. 'नीट' परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातील..
यंदाच्या वर्षांपासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशपद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निकष ठरणारी देशपातळीवर एकच प्रवेशपरीक्षा - नीट (NEET) घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि सीबीएसई यांनी एकत्रितपणे हा निकष निश्चित केला आहे. दिल्लीच्या एआयआयएमएस आणि चंदिगढच्या जेआयपीएमईआर या महाविद्यालयांव्यतिरिक्त देशभरातील सर्व ठिकाणच्या वैद्यक महाविद्यालयांचे प्रवेश 'नीट' परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातील. त्यानुसार, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशही 'नीट'च्या आधारे होतील. या नव्या बदलानुसार, गेल्या वर्षांपर्यंत घेतली जाणारी एमएचटी सीईटी तसेच एआयपीएमटी, एएफएमसी या इतर परीक्षा रद्दबातल ठरल्या असून त्यांची जागा 'नीट' या प्रवेशपरीक्षेने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून  वैद्यक प्रवेशपरीक्षेसाठीचा हा मोठा बदल आहे.

वैद्यक प्रवेशाचा निकष ठरलेल्या या 'नीट' परीक्षेचा अभ्यासक्रम हा 'सीबीएसई'च्या अकरावी आणि बारावीच्या पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमावर बेतलेला आहे. 'नीट' परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल; ज्यात उत्तराचे चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातील एका अचूक उत्तराची निवड विद्यार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. या परीक्षेच्या गुणपद्धतीत निगेटिव्ह मार्किंग असल्याकारणाने चुकलेल्या उत्तरांसाठी गुण गमावण्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे नेमके उत्तर माहीत असलेले प्रश्नच विद्यार्थ्यांनी सोडवावेत.

'
नीट' परीक्षेची काठिण्यपातळी ही 'एआयपीएमटी'सारखी असणार आहे, जी 'एमएच-सीईटी'- या राज्यपातळीवर आतापर्यंत घेतल्या गेलेल्या प्रवेशपरीक्षेच्या तुलनेत जास्त कठीण मानली जाते. त्यामुळे अर्थातच १९९९ पासून २०१२ पर्यंत राज्यात जी 'एमएच-सीईटी' ही राज्यभरातील वैद्यक पदवी प्रवेशासाठीची सीईटी घेतली गेली त्या तुलनेत 'नीट' या प्रवेशपरीक्षेची काठिण्यपातळी अधिक असणार, यात शंका नाही. आणि म्हणूनच या नव्या परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाच्या पद्धतींमध्येही विद्यार्थ्यांनी योग्य बदल करायला हवा.

'
नीट' परीक्षेची परीक्षापद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १८० प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रत्येकी ४५ प्रश्न हे पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र (physics, chemistry, botany and zoology) या विषयांवर विचारले जातील. अचूक उत्तराला चार गुण दिले जातील आणि उत्तर चूक असेल तर त्यासाठी प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल. हे लक्षात घेता विद्यार्थी 'नीट' परीक्षेत - १८० ते + ७२० इतके गुण संपादन करू शकतो.  उलटपक्षी, आतापर्यंत घेतल्या गेलेल्या 'एमएच-सीईटी' परीक्षेत विद्यार्थ्यांला राज्यातील १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी २०० पैकी १७० हून अधिक गुण मिळवणे आवश्यक ठरत होते. यंदाच्या वर्षी 'नीट' परीक्षेत एकूण ७२० गुणांपैकी ३०० गुण व त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांला राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

'नीट' परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पुढील टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील -

१.    'नीट'मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अ‍ॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच 'नीट' देणाऱ्या परीक्षार्थीने गणित विषयाचा सविस्तर अभ्यास करायला हवा. 'नीट' देणारे विद्यार्थी बरेचदा गणिताचा अभ्यास न करण्याची घोडचूक करतात. ती चूक विद्यार्थ्यांनी टाळायला हवी.

२.    फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉम्र्युला सबस्टिटय़ूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल.

३.    अनेक विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रिअ‍ॅक्शन्स या नुसत्या पाठ करतात. मात्र 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने सुरुवातीला रिअ‍ॅक्शन मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्रीची तत्त्वे आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बॉण्डिंग, रिडॉक्स आणि पिरिऑडिक टेबल ही तत्त्वे पूर्णत: समजून घ्यावीत आणि त्यात पारंगत व्हावे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.

४.    'नीट'च्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशकांच्या पुस्तकांचा उपयोग करावा. राष्ट्रीय परीक्षांसाठी शिकवणीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. जे शिक्षक राज्य पातळीवर परीक्षांपुरतेच शिकवतात, त्यांना 'नीट' परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवता येणे शक्य असेलच, असे नाही.
५.     बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे हा विषय चांगलाच लक्षात राहतो. त्याच वेळेस बायोलॉजी या विषयातील अनेक संकल्पनांचे पाठांतर करण्याऐवजी त्या सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक ठरते. ह्य़ुमन जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेन्टेशन, अ‍ॅनाटोमी ऑफ कॉर्डेट्स अ‍ॅण्ड नॉन कॉर्डेट्स, बायोटेक्नोलॉजी आणि मॉलीक्युलर बायोलॉजी या विषयांकडे सर्वसाधारणपणे
सर्वाधिक विद्यार्थी दुर्लक्ष करणे पसंत करतात. मात्र हे विषय महत्त्वाचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयांचा सविस्तर अभ्यास करावा.

६.    'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला बायोलॉजी या विषयाच्या अनेक संकल्पना उत्तमरीत्या माहीत असणे अत्यावश्यक आहे. फिजिक्समधल्या थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नॅटिक्स तसेच केमिस्ट्रीतील आयोनिक इक्विलिब्रिया, ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल्स या धडय़ांचा बायोलॉजीच्या अनेक संकल्पना समजून घेण्यास उपयोग होतो.

७.    'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासासाठी 'एनसीईआरटी'च्या पाठय़पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करायला हवा.

८.    'नीट' परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत परीक्षेपूर्वी
तीन महिने अनेक चाचणीपरीक्षा दिल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि 'नीट'मध्ये विचारल्या गेलेल्या अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. ही निर्णयक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी चाचणी परीक्षांमधील आपल्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.

वर नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या तर वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा देणे आणि त्यातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणे सहजशक्य ठरेल.  
संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र -दुर्गेश मंगेशकर

UPSC Allows Marathi Medium for all

युपीएससी सिविल सेवा २०१३ मुख्य परीक्षा आता सर्वांनाच मराठीतून देता येईल आणि कमीतकमी २५ उमेदवार असणे गरजेचे नाही. पदवी इंग्रजीतून पास झालेले उमेद्वार सुद्धा आता मराठीतून देवू शकतील.
कोणतेही वाड्मय निवडता येईल.
मुख्य परीक्षेतील इंग्रजी विषयाचे १०० मार्क्स फायनल रंकिंग साठी हिशेबात घेतले जाणार नाहीत.
मुख्य परीक्षेत आता अगोदर सारखाच मराठीचा ३०० गुणांचा पेपर राहील व एक इंग्रजीचा सुद्धा.
निबंधासाठी आता २०० ऐवजी २५० गुण असतील व मुख्य परीक्षेचे एकूण गुण १७५० असतील.

व्यावसायिक कौशल्य आणि युक्त्या


यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल , तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास , जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. त्याविषयी थोडंसं... 

व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करण्यासाठी उद्योजकाकडे बाजारपेठेच्या माहितीबरोबरच आणखी काही कौशल्यं असणं जरुरीचं असते. ही कौशल्य अनुभवातूनच जास्त आत्मलसात करता येतात.

इंटरपर्सनल स्किल्स

व्यवसाय म्हटला की लोकांशी संबंध आलाच. त्यामुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडतो की नाही हे तपासा. तुम्ही लोकांशी कशाप्रकारे वागता यावर तुचमं यश अवलंबून असते. स्पर्धेच्या युगात कस्टमर सर्व्हिस हा तुमचा वेगळेपणा ठरू शकतो. पण पेशन्स हवाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे , ऐकून घेण्याची कला असायला हवी. संभाषण म्हणजे फक्त स्वतःचं बोलणं दुसऱ्याला ऐकवणं नव्हे. तर दुसऱ्याचं बोलणं स्वतः ऐकून घेणं असतं.

अडचणी सोडवण्याची कला

व्यवसाय उभा करताना रोज लहान-मोठ्या अडचणी येतच असतात. पण यशस्वी व्हायचं तर या साऱ्यावर मात करायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवायला हवी. तुमचे इतरांशी असलेले चांगले-वाइट संबंधही अशावेळी कामाला येतात.

आर्थिक कौशल्य

व्यवसाय यशस्वी आहे की नाही हे अंतिमतः गल्ल्यावरच्या रकमेवरुनच मोजलं जातं. आर्थिक बाजू पहिल सांभाळली पाहिजे. दररोजचे व्यवहार , व्यवस्थापकीय खर्च , बेसिक अकौटिंग , टॅक्सेशन , आवश्यक सरकारी माहिती आणि ज्या व्यवसायात पडणार त्याची संपूर्ण आणि सखोल माहिती ठेवणं आवश्यक आहे. वेगवेगळे कोर्सेसतज्ज्ञ व्यक्ती आणि इंटरनेटवरूनही अशी माहिती मिळवता येते.

टेक्निकल स्किल्स

कुठलाही व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती हवीच. सुरूवातीला तशी नसली तरी नंतर नंतर अनुभवातून आणि तज्ज्ञांकडून किंवा पुस्तक आणि इतर सोर्सेसकडून तुम्ही ती मिळवणं गरजेचंच आहे. विनामाहिती काम करत असलात तर ते तुमच्या ग्राहकासाठी आणि अंतिमतः व्यवसायासाठी फायद्याचं नाही. अपडेटेड टेक्नॉलॉजीची माहितीही ठेवायला हवी.

सेल्स आणि मार्केटिंग

जेव्हा एखादा यशस्वी उद्योगपती त्याच्या व्यवसायासंबंधी बोलतो , तेव्हा ते आपल्याला ऐकावंसं वाटतं कारण आपण त्या कंपनीच्या सर्वात प्रभावी सेल्समनकडून अर्थात मालकाकडून ते ऐकत असतो. तुमच्या व्यवसायाविषयक काही असे मुद्दे काढून ठेवा की ज्याचा उपयोग कोणत्याही संभाषणाद्वारे उद्योग वाढीसाठी होऊ शकतो. मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे , तर तुमच्या ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना तुमच्या व्यवसायाविषयक माहिती देण्यासाठी वापरलेले अनेक प्रभावी मार्ग. यासाठी ग्राहकांची व मार्केटची सखोल माहिती हवी. याचबरोबर तुमचे प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारे मार्केटिंग करतात , ते प्रभावी आहे का ? याचा अभ्यास करून त्यातील काही मार्ग आपल्या व्यवसायात वापरू शकता. पण कोणाकडेही बाजारात नक्की काय चालेल हे सांगणारी जादूची छडी नाही.
मेधा ताडपत्रीकर

UPSC – Expected New Exam Pattern Mains 2013

Posted on

यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षेची जाहिरात (२०१३) येत्या एक आठवड्यात येणार असून त्यात अपेक्षित असलेले महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असू शकतात:
  • मुख्य परीक्षेत असणारे वैकल्पिक विषय जसेच्या तसे राहतील परंतु प्रत्येकी २ पेपर ऐवजी १-१ पेपर राहतील व त्यांचे गुण सुद्धा दोन्ही मिळून ६०० असतील म्हणजे प्रत्येक पेपर ला ३०० गुण.
  • मुख्य परीक्षेत असणारे सामान्य अध्यानाचे पेपर्स वाढून त्यांची संख्या ४ होईल व प्रत्येकी गुण असतील ३००. चारही पेपर्स चे गुण असतील १२००.
  • मुख्य परीक्षेत असणारे बाकी पेपर्स जसेच्या तसेच असतील – इंग्रजी, भाषा पेपर व निबंध
  • मुख्य परीक्षा मात्र लेखी परीक्षाच राहील, MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होणार नाही.
ह्याबद्दल सर्व माहिती यु.पी.एस.सी. ह्या आठवड्यात नक्कीच जाहीर करेल असे वाटते.
गोंधळून जावू नका, त्यांच्या जाहिरातीची किंवा अधिसूचनेची वाट बघा.
सर्वांना गुड लक !!!

लिपीक-टंकलेखक परीक्षा


1. संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील :
1.१ राज्य शासनाच्या सेवेतील लिपिक टंकलेखक, गट-क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात :-
1.2 पदांचा तपशील -
(1) संवर्ग : अराजपत्रित, गट - क, पदे - (एक) लिपिक टंकलेखक - मराठी (दोन)लिपिक टंकलेखक - इंग्रजी
(२) नियुक्तीचे ठिकाण : पदे फक्त बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या कार्यालयाकरिताच आहेत.
(3) वेतनबँड व ग्रेड वेतन : रुपये 5,200 - 20,200, 1,900 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(४) उच्च पदावर बढतीची संधी : ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहायक किंवा लघुलेखक तसेच पदोन्नतीसाठी सेवाप्रवेश
नियमानुसार उपलब्ध असलेल्या संबंधित कार्यालयातील पदावर.
1.3 शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या पदांचा तपशील, पदसंख्या, आरक्षण, अर्हता, इत्यादी बाबी जाहिरात/अधिसूचनेद्वारे उमेदवारांना उपलब्ध करु न देण्यात येईल.
2. परीक्षेचे टप्पे :- फक्त लेखी परीक्षा.
3. अर्हता :
3.1 महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस. सी.)
किंवा महाराष्र्ट शासनाने एस.एस.सी. शी समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता.
3.2 लिपिक टंकलेखक मराठी या पदासाठी - मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट अथवा लिपिक
टंकलेखक इंग्रजी या पदासाठी - इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
3.3 उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे अत्यावश्यक आहे.


परीक्षा योजना :
१ प्रश्नपत्रिका : एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-
विषय (संकेतांक 013) माध्यम दर्जा प्रश्नांची संख्या एकूण गुण कालावधी परीक्षेचे स्वरुप
मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन आणि अंकगणित इंग्रजी विषयाकिरता इंग्रजी , इंग्रजी वगळता इतर विषयांकिरता मराठी माध्यमिक शालांत परीक्षेसमान. 200 400 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


२ अभ्यासक्रम :
(1) मराठी- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर .
(2) इंग्रजी- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
(3) सामान्यज्ञान- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र , सामाजिक व औघोगिक
सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या,विशेषकरुन महाराष्ट्राच्या
इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
(4) बुध्दिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
(5) अंकगिणत - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक, सरासरी आणि टक्केवारी.

पोलीस भरती विषयी

पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खालील नमूद वय, शैक्षणिक व शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.
1) अ) वय - कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार उच्चतम वयोमर्यादेत सूट असेल).
ब) शैक्षणिक अर्हता - इयत्ता 12 वी पास किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण.
क) शारीरिक पात्रता - महिलांकरिता पुरूषांकरिता
उंची 155 से.मी. पेक्षा कमी नसावी.
165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. छाती
न फुगवता 79 से.मी. पेक्षा नसावी व
फुगवलेली व न फुगवलेली छाती यातील
फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा.


2) शैक्षणिक व शारीरिक पात्रततेत द्यावयाची सूट :
अ) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद. इयत्ता 7 वी पास उत्तीर्ण. उंची - 2.5 सें.मी., छाती - मोजमापाची आवश्यकता नाही.
ब) पोलिस बँड :
अ) शैक्षणिक अर्हता : इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
ब) शारीरिक पात्रता : उंचीमध्ये 2.5 सें.मी. सवलत, छाती - 2 सें.मी न फुगवता व 1.5 सें.मी. फुगवून सवलत.
क) खेळाडू प्रवर्ग - उंचीच्या अटीमध्ये 2.5 सें.मी. इतकी सूट.


3) (1) शारीरिक चाचणी : (100 गुण)
अ) पुरूष उमेदवार :
ब) महिला उमेदवार
1) 5 कि.मी. धावणे - 20 गुण
1) 3 कि.मी. धावणे - 25 गुण
2) 100 मी. धावणे - 20 गुण
2) 100 मी. धावणे - 25 गुण
3) गोळा फेक - 20 गुण
3) गोळा फेक (4 कि.ग्रॅ.) - 25 गुण
4) लांब उडी - 20 गुण
4) लांब उडी - 25 गुण 5) 10 पुल अप्स् - 20 गुण
एकूण - 100 गुण एकूण - 100 गुण


4) लेखी परीक्षा : (100 गुण, वेळ : 90 मिनिटे) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :
1) अंकगणित, 2) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, 3) बुध्दिमत्ता चाचणी, 4) मराठी व्याकरण.
लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.


5) आरक्षण :
1) खेळाडू प्रवर्ग : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानु सार उपलब्ध पदांच्या 5 टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव असतील.
2) महिला : उपलब्ध असलेल्या एकूण पदांच्या 30 टक्के पदे राखीव असतील.


मित्रांनो
परवाच तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, नाही का? मग आता काय निवांत?
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच विचार केला असेल की चला आता निवांत आठ पंधरा दिवस आराम करू या, खूप अभ्यास झाला मागील काही महिन्यान पासून, होय की नाही? अगदी बरोबर आहे तुमच पण काय हो इतके दिवस जास्त होत नाहीत का आराम करायला?
पण तसं पाहाल तर २ दिवस ठीक आहेत हो आराम करायला, मूड फ्रेश करायला कारण आता येणारी मुख्य परीक्षा म्हणजे फारच कठीण आहे आणि त्या परीक्षेसाठी तर अजूनच मेहनत करावी लागणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर २०१० मध्ये घेण्यात येईल. तुमच्याकडे फक्त ५ महिन्यांचा कालावधी आहे तयारीसाठी.
बऱ्याच जणांना माहित नसेल की ही एम पी एस सी मुख्य परीक्षा तुमच्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा फार वेगळी असते.
ह्या परीक्षेत सफल होण्यासाठी आणि मेरीट लिस्ट मध्ये चांगल्यापैकी नंबर मिळवायचा असेल तर मग तुमचं सर्व लक्ष आता ह्या लेखी परीक्षेवर केंद्रित कराव लागणार आहे, हे लक्षात ठेवा.
सर्वसाधारण पाहाल तर, एम पी एस सी ची परीक्षा देणारे फ्रेश पदवीधारक असतात. बरेचजण पहिल्यांदाच ही परीक्षा देत असतात. तुम्ही सुद्धा त्यातीलच असाल असं मला वाटते, हो ना?
पूर्वपरीक्षा मल्टीपल चोइस म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाची असते आणि मुख्य परीक्षा ही सब्जेक्तीव्ह स्वरूपाची असते. तुमच्या कॉलेजची परीक्षा असते तशीच असते पण उत्तरांचं स्वरूप खूप वेगळं असते. कॉलेजच्या परीक्षेत विषयाचं कितपर्यंत ध्ण्यान आहे हे तपासण्यासाठी प्रश्न विचारले असतात पण एम पी एस सी मुख्य परीक्षेचा उद्देश काही वेगळाच असतो. जे कोणी कोलेजच स्टायील मध्ये उत्तर लिहितात ते ह्या मुख्य परीक्षेत नापास होतात. ह्याच कारण हेच की एम पी एस सी निवड करते ती विद्वानाची नाही तर चांगले प्रशासक होवू शकतील अशांची, ज्यांच्याकडे वैचारिक शक्ती आहे त्यांची.
हे सांगायचं तात्पर्य हेच की मुख्य परीक्षेसाठी आकलनशक्ती लागते. प्रश्नांना समजून त्यांच उत्तरं लिहाव लागते. पण त्या आधी ते उत्तरं प्लान कराव लागतं. उत्तरात तुम्ही काय लिहिता ह्याला मार्क्स मिळत नाहीत तर तुम्ही काय लिहित नाही ह्याला मार्क्स मिळतात. समजल का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? जे नको आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही त्यालाच छान उत्तरं म्हणतात.
मला माहित आहे तुम्ही फार हुशार आहात आणि मुख्य परीक्षेसाठी सिरीयस पण आहात. पण अशा खूप महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि कुणी सांगत पण नाही; कारण स्पर्धा खूप असते प्रत्येकामध्ये आणि आपणच सफल व्हावं हे उद्दिष्ट असते सर्वांपुढे म्हणून बर्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात पण मी असं करत नाही आणि करणार पण नाही.
मी सर्व गोष्टी इथेच लिहित बसलो तर बरेच दिवस जातील आणि तुमच्याकडे इतका वेळ पण नाही. म्हणून मी एक वेगळा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे एक संपूर्ण पुस्तकं लिहायचा, ज्यामध्ये सर्वच गोष्टी स्पष्ट करता येतील.
मी “एम पी एस सी सक्सेस मंत्र – द कम्प्लीट म्यनुअल” हे पुस्तकं लिहित आहे. हे पुस्तकं एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी यशाच एक मंत्रच राहणार आहे.
ह्यात काय राहणार आहे? हे बघा सध्या मार्केट मध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे त्यामुळे माझं पुस्तकं असल्याप्रकारच राहणार नाही. मग वेगळं काय असेल ह्यात आणि आम्ही हे पुस्तकं का घ्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल?
बघा जर का युद्धात लढायचं असेल, तलवारी पण असतील पण त्या कशा चालवायच्या हेच माहित नसेल तर युद्ध जिंकता येईल का?
तुमच्याकडे स्टडी मटेरियल खूप आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि मुख्य परीक्षेत पास कसं व्हायचं, मेरीट लिस्ट मध्ये वरती कसं येता येईल हेच माहित नसेल तर त्या महागड्या स्टडी मटेरियल चा काय फायदा?
म्हणून मी तुम्हाला यशाच मंत्र देणार आहे ह्या पुस्तकाच्या रुपात.
ह्या पुस्तकात खालील माहिती राहणार आहे:
  • मुख्य परीक्षा कशी असते?
  • ह्या परीक्षेसाठी कोणाला प्रवेश देण्यात येतो?
  • शैक्षणिक अहर्ता काय असावी लागते?
  • ही परीक्षा केव्हा असते?
  • ह्या परीक्षेचं फॉर्म कुठे मिळतो व फी किती असते?
  • कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
  • फॉर्म कुठे जमा करायचा असतो?
  • फॉर्म जमा करण्यापूर्वी काय नोट करून ठेवायचं असतं?
  • परीक्षेच्या वेगवेळ्या स्टेजेस कोणत्या असतात?
  • किती पेपर्स असतात, कोणते, मार्क्स, प्रश्न किती?
  • कोण-कोणते विषय उपलब्ध असतात आणि कोणते विषय मी निवडायला पाहिजे, आणि का?
  • परीक्षा केंद्र कुठे असतात? कोणतं केंद्र निवडायला पाहिजे आणि का?
  • सर्वच जण ह्या परीक्षेत सफल होवू शकतात का? नाही तर मग कोण होवू शकते?
  • मी तर ऐकलं आहे की फक्त हुशार विद्यार्थीच सफल होतात मुख्य परीक्षेत, पण मी तर इतका हुशार नाही, मग माझ काय?
  • दररोज किती वेळ अभ्यास करावा लागेल ह्या परीक्षेत सफल व्हायला? आणि किती दिवस करावा लागेल?
  • जास्तीत जास्त उमेदवार का नापास होतात राज्यसेवा मुख्य परीक्षेत?
  • मुख्य परीक्षेत सफल कसा होवू शकतो मी?
  • मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि कसा असतो?
  • अनिवार्य विषय कोणते असतात आणि त्याला काय महत्व आहे मुख्य परीक्षेत?
  • कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुख्य परीक्षेत?
  • जर मला मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले पण मुलाखतीत नाही तर काय होणार?
  • कमीतकमी किती गुण मिळाले पाहिजे मुलाखतीत?
  • मुख्य परीक्षेत कसे प्रश्न येतात? त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांचे उत्तर कसे लिहावेत?
  • वेगवेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत प्रश्नाच्या? काय अर्थ आहे त्यांचा?
  • मुख्य परीक्षेसाठी किती पुस्तकं असतात?
  • मी तर ऐकलं आहे की जवळपास ३० पुस्तके असतात तर मग इतक्या पुस्तकांचा अभ्यास कसा शक्य आहे? मला नाही जमणार हे.
  • ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचाच असेल तर मग केव्हा आणि कसा करू? काही प्लानिंग करावं लागेल का?
  • स्टडी प्लान कसे बनवतात? दररोजचा/आठवड्याचा/महिन्याचा/तीन महिन्याचा/सहा महिन्याचा/एक वर्षाचा/दोन वर्षाचा स्टडी प्लान कसा तयार करू?
  • मला पर्सनल स्टडी प्लान बनवून मिळेल का?
  • प्रत्येक विषयासाठी कोणते पुस्तकं वापरू? कोणत्या टॉपिक साठी कोणतं पुस्तक वापरू?
  • कोणते विषय मी निवडू मुख्य परीक्षेला? कोणते निवडायला पाहिजेत?
  • स्टडी मटेरियल कसं आणि कुठून घेवू?
  • नोट्स कसे बनवू? कसे असतात हे नोट्स आणि जरुरी आहे का हे नोट्स बनवणं?
  • अभ्यास कसा करू? इंतेन्सीव की एकस्तेन्सीव?
  • कोणत्या टोपिक्सना महत्व द्यावं?
  • उत्तरं कसे असावेत आणि कसे लिहावेत? उत्तरं लिहितांना काही प्लानिंगची खरच गरज आहे का?
  • परीक्षकाला आमच्याकडून काय अपेक्षित असते उत्तरांमध्ये?
  • कोणती मासिकं वाचायला पाहिजेत?
  • परीक्षेत उत्तरं लिहितांना वेळेचं महत्व काय आहे आणि वेळ कसा म्यानेज करावा?
  • आता उपलब्ध असलेल्या वेळेत इतका अभ्यासक्रम कसा काय कम्प्लीट करू?
  • प्रश्न कसे असतील हे मला अगोदर कळेल का, म्हणजे मी तशी तयारी करून घेईल?
  • चालू घडामोडी वर कसे प्रश्न असतात, ह्याची तयारी कशी करू? कोणत्या महिन्यापर्यंत च्या घडामोडी वर लक्ष केंद्रित करू?
  • रेफरन्स पुस्तकं कोणते आहेत आणि कुठे मिळतील? इंडिया इयरबुक, मनोरमा इयरबुक, वगेरे?
  • ह्या रेफरन्स पुस्तकातून काय काय वाचू, हे पुस्तकं तर खूप मोठ-मोठे आहेत?
  • जुन्या प्रश्न पत्रिका कुठे मिळतील आणि त्या सोडवायचा सराव करू का? काय होईल नाही सराव केला तर?
  • रिविजन म्हणजे काय? सर्वच पुस्तकं परत परत वाचू का? असं करायची काय गरज आहे, मी तर अगोदरच त्यांचा अभ्यास केला आहे ना, मग?
  • रिविजन कशाची करू तर मग? आणि केव्हा करू?
  • मॉक एग्झाम काय असतात आणि त्यांचं महत्व तरी काय आहे?
  • मुख्य परीक्षेचा टाईम टेबल केव्हा आणि कुठून मिळेल?
  • मुलाखत काय असते आणि तिचं महत्व काय आहे मुख्य परीक्षेत?
  • मुलाखतीसाठी काय तयारी करावी लागते?
  • काय आणि कोणते कपडे घालू मुलाखती साठी?
  • तिथे मुलाखत रूम मध्ये कोण असते, कोणाला आधी नमस्कार करू?
  • खुर्चीवर केव्हा आणि कसं बसू? पाय कसे ठेवू? हसू की सिरिअस राहू?
  • मुलाखतीत काय विचारतात, कसे उत्तरं द्यावे लागतात?
  • मुलाखतीत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील मला?
  • ते मला प्रश्न विचार म्हटले तर मी काय प्रश्न करू त्यांना?
  • फायनल मेरीट लिस्ट केव्हा लागते आणि माझा नंबर लागेल का त्यात?
  • आणि अनिल सर तुमच्या मदतीनं लागलाच तर मला काय कराव लागेल?
  • काही ट्रेनिंग राहील का मला माझ्या जॉबवर? की डायरेक्ट नौकरी सुरु?
  • असे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ह्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा तर तुम्ही स्वप्नातही विचार केलं नसेल, होय की नाही?
म्हणूनच तर म्हणतो की हे पुस्तकं म्हणजे एम पी एस सी मुख्य परीक्षेमध्ये यश मिळावं त्याचं मंत्रच आहे, तर मग आत काय कराल?
चला आजच ह्या पुस्तकाची बुकिंग करा कारण मी फक्त जे बुक करतील त्यांच्यासाठीच छापणार आहे.
जास्त माहिती करिता व कसं बुक करायचं ह्याबद्दल माहिती इथे आहे: http://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
आणि इथे सुद्धा: http://wp.me/PPyoH-5h
तर मग कशाची वाट बघता, कसला विचार करता आहात?
तुमची स्वताची एक प्रत आजच बुक करा, आजच काय आताच.
=====================================================

Dont Waste Your Precious Time – Start Your Preparation for MPSC Main Exam 2010

Hi Friends
Now your MPSC Prelims (Purvapariksha) is over. Please do not waste your time anymore. Start your preparation as soon as possible for the next hurdle, i.e. MPSC Main Exam which will be conducted in the month of Nov/Dec 2010.
MPSC Main Exam is NOT like your college exam. It is totally different. This is the toughest exam for Government services.
To succeed and secure a very good place in the final merit list, you need to give highest attention to this written exam. Usually, candidates are fresh graduates/post-graduates who appear in MPSC Exam, so they are trained for university exams that tests them for subject knowledge based on the range of their memory. They are habitual of writing complete and detailed answer on the subject matter and they try to answer in the same style in MPSC Main exam. And the result is that they FAIL in this exam. You know why?
MPSC does not recruit academicians, it recruits good administrators.
Therefore, you need to answer the questions in an analytical, critical, comparative way. This is what MPSC looks for in the candidates.
After reading and understanding the question in Main exam paper, you have to plan your answer before writing it. You get marks not for what you write but for what you don’t write. This is the trick to write very informative answer and not anything irrelevant.
I know you are very ambitious and very serious about MPSC Main Exam 2010 but you need proper guidance. Because the competition is very tough and you want to succeed in this attempt itself. Am I right?
Selection of books for optional subjects is also very important. There are so many issues that I can’t write about all of them here; so I have chosen a different way.
At this moment, I am writing the “MPSC Success Mantra – The Complete Manual” which will solve all of your problems. It will not be a study material type book but a guide that will deal with the following:
  • making you understand the structure of the exam
  • make you ready for the exam
  • Who is eligible?
  • Edn qualifications, Age, Attempts
  • Categories, Reservations
  • Exam notification
  • Where to get Exam forms
  • Fees
  • Any Certificates to be attached
  • Where to submit form
  • Recording of Form number for future use
  • Stages of exam
  • Papers, marks, types of questions, time allowed
  • What are the optional subjects available?
  • What are the exam centers for the Main Exam?
  • Can anyone be successful at this exam?
  • I heard that only intelligent candidates can clear this exam
  • How much time should you dedicate for the study everyday?
  • Why Most Candidates Fail in MPSC State Services Examination?
  • How to succeed in MPSC main exam?
  • Understanding the Main exam in detail
  • main exam Syllabus
  • Compulsory Subjects and their importance
  • Minimum Marks Required to Qualify for Interview
  • Understand question types, the terms, and how to solve question paper GS
  • Understand question types, the terms, and how to solve question paper Optionals
  • Study Plans – Yearly/Quarterly/Monthly/Weekly/Daily
  • Personal study plan – Main exam
  • What books to refer for each subject? Topics-wise books
  • what the examiner wants from you
  • choosing your optional subjects
  • collecting study material
  • planning your studies over next 1/3/6/12 months
  • various study plans
  • how to make notes during your preparation
  • intensive or extensive study
  • which books/magazines to refer/read
  • how to write the answers
  • time management during exam
  • what books to refer for the subjects
  • what portions to be given importance
  • how to cover the syllabus in given time
  • what types of questions will be asked
  • how you should write the answers
  • Current affairs
  • What to Study from India Year Book
  • Importance of solving old question paper sets and when to solve
  • Revision
  • Important topics to be specifically read
  • Mock exams and their importance
  • Exam time table, where to get it from
  • All about the Interview and scoring high in it.
  • and much more
So it will be a complete Bible like manual on how to succeed in MPSC Main Exam?
Please book your copy TODAY
More information is available at this location:
http://anilmd.wordpress.com/mpsc-success-mantra-the-complete-manual/
and
http://wp.me/PPyoH-5h
What are you waiting for?
Book your own copy of the Manual, TODAY

मध्यम व मोठा उद्योग


मराठवाडयातील सर्वसामान्य माणसांना उद्योगात पडण्यासाठी प्रोत्साहन हवे असते. त्याची आवश्यकता लक्षात घेऊन या वेबसाईट संबंधीत माहिती दिलेली आहे. जिल्हा उद्योग केंद्रात लघु उद्योग म्हणून नोंदणी करण्यापासून ते राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाकडे कशाप्रकारे अर्ज करावेत, याची लघु उद्योजकांना माहिती असणे आवश्यक आहे. उद्योग लघु, मध्यम वा मोठा असो, खेळत्या भांडवलापासून ते उद्दिष्टित व्यावसायिक उपक्रमांचे नियोजन करता आले पाहिजेत. आणि त्यानंतर या पूर्ततेसाठी कोणकोणत्या शासकीय संस्था, बँका, महामंडळे साहाय्यभूत ठरतात, हे या संकेतस्थळावर सांगितलेले आहे.



जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्या सारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेल्या व्यवसायाच्या लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवला पासून ते व्यवसाय सुरळीत चालू होई पर्यंत आपणास सहकार्य करतात.



अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.

Ministry of corporate Affairs

MIDC

mced.nic.in

www.dcmsme.gov.in

www.mitconindia.com

Bank of Maharashtra Schemes for Self Employment

ese.mah.nic.in

dget.nic.in

Ministry of Labour

Mahashram, MAH State Labour Laws

Schemes of Central Government

Industrial Development Bank of India



MSME च्या व इतर काही स्कीम्स

Scheme of Surveys, Studies and Policy Research

Entrepreneurship Development Institution Scheme

Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries (SFURTI)

Rajiv Gandhi Udyami Mitra Yojana (RGUMY)

Marketing Assistance Scheme (Implemented through NSIC)

Performance and Credit Rating Scheme (Implemented through NSIC)

Industrial Licencing Policy

Technology Upgradation Fund Scheme

Infrastructure Strengthening of Leather Sector

Software Technology Parks Scheme

Prime Minister's Employment Generation Programme (PMEGP) (Implemented through KVIC)

Product Development, Design Intervention and Packaging (PRODIP) (Implemented through KVIC)

Khadi Karigar Janashree Bima Yojana for Khadi Artisans (Implemented through KVIC)

Interest Subsidy Eligibility Certification (ISEC).

Credit Guarantee Fund Scheme

National Small Industries Corporation Ltd.

National Manufacturing Competitiveness Council

Investment in Intellectual Property

कुटीर उद्योग


कुटीर उद्योग एक प्रकारचा निर्मिती उद्योग आहे, ज्यामध्ये अनेक उद्योजक घरातूनच वस्तूंचे उत्पादन करत असतात. उद्योगक्रांती येण्याअगोदर कुटीर उद्योगांचा चलनवाढीमध्ये व प्रगतीमध्ये मोठा सहभाग होता. तसेच भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे अजूनहि कुटीर उद्योग भारतात मोठ्या प्रमाणावर चालतात. कुटीर उद्योगासाठी लागणारे भांडवल आणि मनुष्य बळ अत्यंत कमी असल्या मुळे अजून हि कुटीर उद्योग भारतात लोकप्रिय आहेत. कुटीरद्योगांतर्गत विविध प्रकारचे गृहउद्योग असतात, जसे अगरबत्ती, कापडी पिशव्या बनवणे, शेवया बनवणे इत्यादी. अशा प्रकारच्या उद्योगास आज किराणा दुकान, कंपनी व इतर मेगामार्टस् मध्ये अशा घरगुती पदार्थांना खूप भाव असतो आणि खाद्यपदार्थांची विक्रीहि खूप असते.



जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्यासारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेला व्यवसायाचा लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवलापासून ते व्यवसाय सुरळीत चालू होईपर्यंत आपणास सहकार्य करतात.



अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करू शकता.

Khadi & Village Industries Commision

Maharashtra Industrial Development Corporation

Cottage Emporium India

India Business Website

Schemes of Central Government

Schemes for Self Employment

Maharashtra Centre For Enterpreneurship Development

Mitcon India

Ministry of Food Processing Industries

Minority Development, Maharashtra

Ministry of Labour

Mahashram, MAH State Labour Laws



कुटीर उद्योगासंबंधित काही उद्योग खालीलप्रमाणे

शेवया

पापड बनविणे

घरगुती खानावळ

चिक्की

फोटो ग्राफी

साडीचा पिको फॉल तयार करणे

अगरबत्ती

कापडी पिशव्या

सुगंधित सुपारी